वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून सौ.ज्योती अंबेकर महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९६७ रोजी परंडा (जिल्हा उस्मानाबाद) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण लातूर येथील देशिकेंद्र विद्यालय आणि दयानंद महाविद्यालय येथे झाला. बी. कॉम. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) येथे पत्रकारिता अभ्यासक्रमातील पदवी (बी.जे.) मिळविली. केंद्र सरकारच्या भारतीय सेवेतील (आयआयएस्) त्या माजी अधिकारी आहेत आणि तसेच दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावरील त्या माजी वृत्तसंपादक आहेत.
सह्याद्री वाहिनीवर त्या गेल्या १२-१३ वर्षे बातम्या देत आहे. संयतपणे प्रेक्षकांना समजेल अशारीतिने त्या बातम्या वाचतात. त्यात कोठेही कृत्रिमता किंवा नाटकीपणा नसतो, म्हणूनच त्यांचे वृत्तनिवेदन लोकांना आवडते. बातम्या वाचणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, मुलाखती घेणे हा त्यांचा छंद किंवा आवडीचा भाग आहे. मुळात मराठवाड्यातील ग्रामीण भागातून येऊन त्यांनी ‘आवाजा’ च्या क्षेत्रात केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आपल्यातील अंगभूत गुणांना चांगले वळण देऊन आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करता येतात, याचे ज्योती अंबेकर या उत्तम उदाहरण आहेत. दूरदर्शनमध्ये सहज म्हणून वृत्तनिवेदकासाठी अर्ज केला आणि त्यांची लेखी परीक्षा, मुलाखत, स्क्रीन टेस्ट अशा रीतसर प्रक्रियेनंतर बारा हजार जणांमधून प्रथम क्रमांकाने निवड झाली. बोलण्याचे आपले कौशल्य अधिक धारदार करण्यासाठी आवाज जोपासना शास्त्राचा अखेरचा शब्द म्हणून ओळखले जाणारे डॉ. अशोक रानडे यांचाकडे ज्योती अंबेकर यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणच्या शिदोरीवर आणि त्याआधारे भरपूर मेहनत घेउन त्यांनी स्वतःला घडविले आणि ‘निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत’ या संवाद-कलेच्या प्रांतात त्या एक मानदंड ठरल्या.
वृत्तनिवेदक, कार्यक्रम सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून सुपरिचित असलेल्या ज्योती अंबेकर या भारतीय माहिती सेवेच्या अधिकारी असून त्या सध्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात वृत्तसंपादक आहेत. त्या दूरदर्शनच्याही वृत्तसंपादक होत्या. मराठवाड्यातून येऊन मुंबईच्या आणि एकूणच राज्याच्या सांस्कृतिक आणि विशेषत: सूत्रसंचालन क्षेत्रात स्वत:चे विशेष स्थान त्यांनी निर्माण केले आहेच पण दूरदर्शनवर वृत्तनिवेदन करणार्यात मराठवाड्यातील त्या पहिल्या निवेदक आहेत. एवढेच नव्हे तर एकाचवेळी वृत्तनिवेदन आणि वृत्तसंपादन करणार्यात त्या दूरदर्शनच्या इतिहासातील एकमेव अधिकारी होत. अनौपचारिक, खेळकर आणि प्रसन्नता ही त्यांच्या सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये आहेत. संवाद कौशल्याशी संबंधित कार्यशाळेमधून मार्गदर्शन आणि प्रासंगिक लेखन करणे हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे.विशेषत:सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, तज्ञांच्या जाहीर मुलाखती, चर्चासत्रांचे समन्वयन यातील त्यांचे कौशल्य नेहमीच वाखाणले जाते.
नेहमीच प्रसन्न आणि हसतमुख असणाऱ्या ज्योती अंबेकर यांचे व्यक्तिमत्व लोभसवाणे आहे. आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर त्यांनी आतापर्यंत शेकडो जाहीर कार्यक्रमांचे सूत्र संचालन केले आहे. गेल्या १५ वर्षातील सर्व मुखमंत्री, उपमुख्यमंत्री, शास्त्रज्ञ, संपादक, वकील, डॉक्टर्स, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींच्या त्यांनी जाहीर ‘लाईव्ह’ मुलाखती घेतल्या आहेत. अगदी सहजपणे पण स्वतः कमी बोलत मुलाखतकर्त्याकडून लोकांना आवश्यक असलेली उपयुक्त माहिती काढून घेण्याच्या त्यांच्या कौशल्याबद्दल त्या वाखाणल्या जातात.
ज्येष्ठ नागरिक आणि सध्याची पिढी यांच्यातील वाद-संवाद, ज्येष्ठांची समाजाला आणि कुटुंबाला असलेली गरज आणि आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची आवश्यकता...
महिला आणि युवती यांच्या म्हणून अशा वेगळ्या समस्या असतात. त्यांचे काही प्रश्न असतात.आपल्याकडील कुटंब व्यवस्थेच्या चौकटीत त्यावर मोकळेपणाने बोलता येत नाही...
युवक-युवतींच्या म्हणून अशा वेगळ्या समस्या असतात. त्यांचे काही प्रश्न असतात ज्यावर ते आपल्या आई-वडिलांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. वाढत्या वयात शारीरिक आणि मानसिक बदलांशी...